* ही योजना तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव व अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या म्हणजेच राव-मोहन यांच्या प्रतीमानावर आधारित होती.
* या शतकाच्या अखेरीपर्यंत बेरोजगारीचा प्रश्न पूर्ण सुटावा या दृष्टीकोनातून पुरेशा प्रमाणात रोजगारनिर्मिती करणे, जनतेच्या सहकार्याने लोकसंख्या वाढीचा वेग कमी करणे, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण घडवून आणणे, १५ ते ३५
वर्षे या वयोगटातील निरक्षरता दूर करणे, सर्व जनतेस पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्द करून देणे, कृषीउत्पादन वाढविणे
त्याच प्रमाणे सर्वच क्षेत्रात प्रगती घडवून आणणे हे या योजनेचे उदिष्ट होते.
* आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये यावयाची उदिष्टे नियोजित राष्ट्रीय गुंतवणूक स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात २३% होती तथापि
प्रत्यक्षात ती २५% साध्य झाली.
* योजना काळात २.६% उदिष्टे होती, तर २.४१% दराने उदिष्टे साध्य झाली.
* योजनाकाळात राष्ट्रीय उत्पन्नात ५.६% उदिष्टे असता ६.७% दराने साध्य झाले.
* या योजनाकाळात औद्योगिक उत्पादनात ८.२% या दराने वाढ घडून आले.
* कृषी उत्पादनाचा दर ४.१ असता तर प्रतिवर्षी ३.६% दराने घडून आले.
* या योजनेत १५ ते ३५ वयोगटातील १००% साक्षरता घडून आणण्याचे ठरवले असता तसेच प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण घडून आणण्याचे उदिष्ट ठेवले गेले.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा