क्रिप्स योजनेचे परिणाम
* क्रिप्स योजने अंतर्गत इंडियन युनियन स्थापन होऊन युनियन मध्ये अनेक राज्ये सहभागी होणार होती. ब्रिटीश राष्ट्रकुटुंबातून केव्हाही बाहेर पडू शकत होते.त्यामुळे भारतातील राज्ये हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात येवू शकले असते. व भारतातील राष्ट्रीय ऐक्य नष्ट झाले असते.
* घटना समितीमध्ये संस्थांचे असलेले प्रतिनिधी हे प्रत्यक्ष जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी नसून संस्थानिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी होते.
* युद्ध संपुष्टात येईपर्यंत संरक्षण खात्यावर इंग्रजांचेच वर्चस्व या योजनेमुळे राहणार होते.
* हिंदुस्तनातील इंग्रजांना आपली सत्ता सोडायची आहे कि त्यासंदर्भात केवळ आश्वासन दिले जात आहे. याचे स्पष्ट उत्तर या योजनेमध्ये नव्हते. त्यामुळे क्रिप्स या योजनेच्या राष्ट्र्सभा व मुस्लिम लीग या दोघांनाही मान्य नव्हत्या.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा