चले जाव \ छोडो भारत चळवळ [१९४२]
दुसऱ्या महायुद्धाच्या परिस्थितीत संकटात सापडलेल्या इंग्लंडने आपल्या पार्लमेंटमधील क्रिप्स नावाच्या ज्येष्ठ सभासदाला भारतात पाठविले. भारतीयासाठी नवीन योजना ठरवून दिल्या. परंतु क्रिप्स साहेबांनी मांडलेल्या योजना या फसवणुकीच्या योजना आहेत. याची जाणीव झाल्यानंतर राष्ट्रसभेने मुस्लिम लीगचे सर्व स्तरातून क्रिप्स योजनेला विरोध केला. यावर इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल साहेबांना हिंदुस्तानचा स्वतंत्र द्यायचे नाही. याची जाणीव झाल्यानंतर एक स्वतंत्र लढ्याची तयारी महात्मा गांधीनी करण्याचे ठरविले. यातूनच छोडो भारत चळवळ सुरु झाली.
चळवळीची कारणे
* क्रिप्स योजनेला अपयश
* राज्यकर्त्यांची कृत्ये
* जपानी आक्रमणे
* इंग्रजांचा विरोधाभास
* म. गांधीचे वास्तव धोरण
छोडो भारत चळवळीची कलमे
* इंग्रजांची राजवट चालू राहणे हि आम्हांला अपमानास्पद वाटत असून ती हिंदुस्तानातील दुर्बल करीत आहे.
* हिंदुस्तानच्या स्वतंत्र प्राप्तीनंतर संयुक्त राष्ट्र व इंग्लंड याची परीक्षा ठरणार असून या स्वतंत्र्याचा आदर्श इतरही गुलाम राष्ट्रे घेतील.
* हिंदुस्तान आपली संपूर्ण शक्ती पणाला लाऊन स्वतंत्र प्राप्त करेल.
* हिंदुस्तानला स्वतंत्र प्राप्त झाल्यानंतर हंगामी सरकार स्थापन करता येईल.
* गेल्या बावीस वर्षापासून राष्ट्र सभेने शांततेच्या लढ्यासाठी चळवळ उभारली आहे. त्याच पद्धतीने हि चळवळ संपूर्ण देशव्यापी बनवावी व गांधीजीच्या नेतृत्वावर कार्य करावे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा