महाराष्ट्रातील वनक्षेत्र -
राज्यात कृषीव्याप्त जमिनीनंतर दुसरे मोठे क्षेत्र हे वनाखाली येते. राज्याच्या वनविभागानुसार वनचे क्षेत्र ५५,८१९ एवढे आहे. त्या एकूण क्षेत्रापैकी ८४% राखीव, ११%संरक्षीत, ५% अवर्गीकृत आहे. वनच्या अच्छादनानुसार मध्यम दाट जंगल ४० ते ७० टक्क्यापर्यंत आहे. खुले वन जेथे १० ते ४० टक्के आहे. खुरटे वने १० टक्क्यापेक्षा कमी आहे.
राज्यात कृषीव्याप्त जमिनीनंतर दुसरे मोठे क्षेत्र हे वनाखाली येते. राज्याच्या वनविभागानुसार वनचे क्षेत्र ५५,८१९ एवढे आहे. त्या एकूण क्षेत्रापैकी ८४% राखीव, ११%संरक्षीत, ५% अवर्गीकृत आहे. वनच्या अच्छादनानुसार मध्यम दाट जंगल ४० ते ७० टक्क्यापर्यंत आहे. खुले वन जेथे १० ते ४० टक्के आहे. खुरटे वने १० टक्क्यापेक्षा कमी आहे.
सामाजिक वनीकरण -
रस्ते, लोहमार्ग, कालवे, नद्यांचे प्रवाह, शाळा, महाविद्यालये, शासकीय मालकीच्या मोकळ्या जागा, नापीक क्षेत्र, या ठिकाणी वृक्षारोपण केले जाते याला सामाजिक वनीकरण म्हणतात.
वनसंरक्षण -
महाराष्ट्रातील उपलब्द असलेल्या वनस्पतीच्या प्रकारांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. कारण राज्यामध्ये एकूण वनक्षेत्र पैकी २०% क्षेत्र अरण्याखाली आहे. राष्ट्रीय वनधोरणानुसार राज्यामध्ये एकूण जमिनीच्या ३३.३३% अरण्ये असावयास पाहिजे. यासाठीच वन संरक्षणाची गरज आहे.
वृक्षारोपण कार्यक्रम -
वृक्षारोपण हा २० कलमी कार्यक्रम एक भाग असून सामाजिक वनीकरण विभागामार्फत २०१० ते २०११ नुसार वृक्षारोपण वन विभाग यांच्या मार्फत करण्यात येतो.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा